पोस्ट्स

मूगडाळ खाण्याचे फायदे

आपल्या आहारात विविध डाळींचा समावेश असतो. मात्र यात विशेषतः मूगडाळीचा समावेश असेल तर तुमच्यासाठी ते नक्कीच फायदेशीर ठरेल. चला तर आज मूगडाळीचे फायदे जाणून घेऊयात...  ▪ चेहर्‍यावरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे.  ▪ मूगडाळीमध्ये व्हिटॅमिन आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या तसेच नैसर्गिकरित्या चेहर्‍यावरील डाग कमी होतात. ▪ मूगडाळीमुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. केसांना समूळ मजबुतपणा येण्यास मदत होते.  ▪ मूग पचायला हलका आहे. त्यामधील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते.  ▪ मूग भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. यामुळे वजन घटवण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी मधल्या वेळेत लागणार्‍या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग खाणं फायदेशीर आहे. ▪ मूग खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रासही आटोक्यात राहतो. यामुळे रक्तातील मॅग्नेशियमचा प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी काही खास टिप्स

▪ प्रायोरिटी आयुष्यात कोणत्याही बाबतीत तुमची प्रायोरिटी नेमकी कशाला आहे हे नक्की करा, यामुळे जवळपास निम्म्या गोष्टी सोप्या होऊन जातात. ▪ मर्यादा आखून घ्या एखाद्या गोष्टीसाठी आपण कुठपर्यंत आणि किती काम करायचे हे ठरवून घ्या. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि ती असू द्या, कारण वेळेला खूप महत्व असते. ▪ स्मार्टवर्क करा कष्ट केले कि फळ मिळते हे अर्थात बरोबर आहेच, पण आता हार्डवर्कला स्मार्टवर्कची जोड देणे हे खूप महत्वाचे झाले आहे. धावत्या जगाशी बरोबरी साधायची असेल तर हे स्मार्टवर्क तुम्हाला अवगत करून घ्यावे लागेल. ▪ पुरेशी झोप घ्या प्रत्येकाला काम करायचं असतं, मग कोणी गृहिणी असो, व्यवसाय करणारा असो किंवा नोकरी करणारा, प्रत्येकाला काम करणे भाग आहे. पण या कामाच्या व्यापात आपली पुरेशी झोप होणे हे फार गरजेचे आहे, कारण आपली तब्येत ठीक असेल तर आपण काम करू शकणार आहोत. ▪ रुटीन दिवसभराचं असेल किंवा आठवड्याभराचं असेल, तुमच्या कामाचं रुटीन ठरवून घ्या. रुटीन ठरवून घेतले तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायला संधी मिळेल. कामासोबत आपल्या स्वतःसाठीचा वेळ हा फार महत्वाचा असतो. ▪ नाही' म्हणायल...

जीवन जगण्याचे तत्व ९०/१०

आपलं मानस शास्त्र वरून अज्ञात लेखकाचा वाचनीय लेख....... 😇९०/१० तत्व फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावरील आपल्या प्रतिक्रियावर अवलंबूनअसतं. जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो. उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे. या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून असतं. उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला......    हे फक्त १०% झालं,मात्र यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून असतं. तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐ...

वायरमन - एक संघर्ष कथा

वायरमन                         नाव ऐकल्यावर असे वाटायचे की मी पण वायरमन झालो पाहिजे मला पण वायरमनची नोकरी करायला पाहिजे किती मस्त जीवन असते वायरमनचे सकाळी कामावर जायचे ड्युटी करायची कोणाच्या घराची लाईन बंद असेल तर चालु करायची फ्युज गेला असेल तर तो टाकुन लाईन चालु करायची मग संध्याकाळ झाली का ड्युटी संपल्यावर घरी जायचे आणि आपल्या परिवाराला वेळ द्यायचा छान जिवन जगायचे पब्लिक पण आपल्याला मानसन्मान देतील आपलापण एक वेगळाच रुबाब असेल आपलापण कोणालातरी धाक असेल अस सगळ मनात वायरमनचे चित्र होते.  मग मी पण आयटीआय केला अप्रेंटीस केली आणि आपल्या कामधंद्याला लागलो प्रायवेट वायरमनचे कामसुरु केले नविन नविन खुप त्रास झाला आणि एकदाची सवय झाली रुटीन तस व्यवस्थित चालु होते नंतर महावितरण ची जाहिरात आली ज्युनियर टेक्निशियनची मला वाटल पोस्ट चांगली इम्प्रेसिव आहे  मग मनात पुन्हा वायरमनचे चित्र तयार झाले व त्याविषयी कल्पना पुन्हा मनात पहिल्या सारख्या आठवल्या परिक्षा पास झालो आणि नौकरीवर रुजु झालो कार्यालयात रुजु झालो नविन नविन कोणी जास...

चष्म्याचा नंबर कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय

डिजिटल युगात टिव्ही, मोबाईल आणि कॉम्प्युटर समोर तासन्-तास घालवल्याने हल्ली कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कित्येकांना हा चष्मा नको असतो. तुमचा हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता येऊन चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो. चला तर अशाच काही उपायांबाबत जाणून घेऊयात...  ▪ जीरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या. ▪ दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा. ▪ दररोज ग्रीन टीचे सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंटस् डोळ्यांना निरोगी राखण्यास मदत करतात. ▪ रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा.  ▪ रोज रात्री 6-7 बदाम भिजत घाला आणि सकाळी ते खा. ▪ 3-4 हिरव्या वेलची एक चमचा बडिशेपसोबत वाटा. हे मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या. ▪ गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. ▪ एक चमचा बडिशेप, 2 बदाम आणि अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करुन बारीक पूड करा. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हे मिश्रण टाकून प्या. ▪ रोजच्या जेवणात नियमितपणे हिरव्...

Md India Policy Number (mediclaim) Mahavitaran

मेडिक्लेम पॉलिसी 2019 To 2020 सदर क्रमांक महावितरण चे कर्मचारी ज्यानी मेडिक्लेम मध्ये नोंदणी केलेली आहे त्यांच्या करीता आहे. खालील क्रमांक कॉपी करुण पॉलिसी नंबर च्या जागी पेस्ट करावा. नंतर भ.नि.नि क्रमांक टाकून आय कार्ड डाउनलोड करावेत. https://mdindiaonline.com/E-Cardrequest.aspx  दिलेल्या लिंकवर जावून खालील स्टेप कराव्यात... १) The oriental Insurance company Select करा... २) Customer type - Corporate select करा.. ३)  पॉलिसी नंबर     :-     163600/48/19/07956 ४) भ.नि.नि.क्र. टाका त्यानंतर आपल्या परिवारातील सर्व नावे दिसतील.ECard clickकरुण open करावे..ECard Print काढावे..

Marathi Quotes

1) मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात , पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात ....!! तुटले तर श्वासानेही तुटतील , नाहीतर वज्राघाेतानेही तुटणार नाहीत ....!! 2) संवाद दोनच माणसांचा होतो , त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात .... !!  3) कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं .... !!  कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .... !! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो .... !! 4) जाळायला काही नसलं तर पेटलेली   काडीसुद्धा आपोआप विझते .... !! 5) खर्च झाल्याचं दु:ख नसतं , हिशोब   लागला नाही की मग त्रास होतो .... !! 6) प्रॉब्लेम्स कुणाला नसतात ....? ते शेवटपर्यंत असतात .... !! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच .... !! ते सोडवायला कधी वेळ हवा असतो ,  कधी पैसा तर कधी माणसं .... !! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो .... !! 7) आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात .... !! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही . पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात . आठवणींच...